संस्कृतात उत्तररामचरित नावाचं अजरामर नाटक रचणारा भवभूति हा एक त्याच्या उमेदीच्या काळात उपेक्षित राहिलेला कवी होता. पण त्याला प्रचंड आत्मविश्वास होता. आज कोणाला माझं वाङ्मय आवडत नाही कारण मी काळच्या पुढे आहे असं त्याला माहित असावं. म्हणूनच त्यानं एक मस्त वाक्य लिहून ठेवलं आहे.

उत्पत्स्यते हि मम कोऽपि समानधर्मा कालोऽह्ययं निरवधिर्विपुला च पृथिवी l

अर्थ - माझ्यासारखा (माझ्यासारख्या संवेदना असणारा) कोणीतरी केव्हातरी कुठेतरी नक्कीच जन्माला येईल. हा काळही अमर्याद आहे आणि ही पृथ्वीही खूप मोठी आहे.

तसंच काहीसं धोरण ठेवा. वाचकांना वेळ द्या. आणि स्वतःच्या कलाकृतीबद्दल आत्मविश्वास ठेवा. कारण कुणी काही म्हटलं / म्हटलं नाही तरी ते तुमचं अपत्य आहे. त्यावर कुणी प्रेम करो न करो तुम्ही नकीच करत राहणार आहात.

अर्थात जाहीर केलेल्या कवितेबाबत तुमची अपेक्षा रास्त आहे. भूषणशी मी सहमत आहे. पण निराश अवस्थेबाबत तुम्ही उल्लेख केलात म्हणून हा प्रेमाचा सला. नैराश्य नको. आत्मविश्वास पाहिजे आणि नव्या सृजनाची नवी उमेदही.