ही कविता आवडली. विशेषतः नाव आणि खिवैय्या!
पण आपला 'चला माझ्या कविता वाचणारा (खरेतर समजणारा) एक तरी रसिक आहे!" हे वाचून वाईट वाटले. दाद यावी अशी अपेक्षा कोण करत नाही? पण त्याबद्दलचा उतावीळपणा योग्य नाही.प्रतिसाद देणाऱ्या शिवाय इतर वाचक आपली कविता "समजणारे नाहीत' हा इतर वाचकांचा अवमान आहे! समजा, मी 'ही कविता अजिबात आवडली नाही" असा प्रतिसाद चटकन दिला असता तर आपण 'आपल्याला कविता समजत नाही' असे उत्तर दिले असते का? आपली कविता माझ्यासारख्या सामान्य वाचकाला न समजण्याइतकी गहन किंवा दुर्बोध नाही! 'दाद आली नाहीतर वाचक अरसिक!' असा उतावीळ निष्कर्ष काढू नये.उलट आपल्या कवितेच्या गुणवत्तेत काही कमी नाही ना हे तपासून पहावे!!

प्रामाणिक सल्ला. राग नसावा.

जयन्ता५२