मतदानाला जावंच. आपण मतदानाला गेलोच नाही तर आपण जागरूक की उदासीन हे त्यांना तरी कळणार कसं?
पण खरंच कोणी विश्वासार्ह वाटत नसल्यास तसं स्पष्ट सांगून मत न देण्याचा अधिकार आता कायद्याने दिला आहे आपल्याला. एखाद्या मतदारसंघात अशी १०%पेक्षा जास्त मतं आली तर तिथे फेरनिवडणूक होते आणि पूर्वीच्या एकाही उमेदवाराला त्यात उभे राहता येत नाही अशी तरतूद आता आहे ना!
(आपलाच खर्च वाचवायचा असेल तर मात्र हे करून चालायचं नाही. फेरनिवडणुका येत राहिल्या तर आपले खिसे रिकामे होतील, त्याचं काय हा अनुत्तरित प्रश्न आहे.)
पण एकदा हिसका दाखवायला काहीच हरकत नाही!