जर आपण असा विचार केला की पिढी दर पिढी संस्कार कमी होत जातील आणि जसं निरंजन म्हणतात कि "अशा परिस्थितीत कोणीही सुजाण माणूस मुलाना जन्म देणार नाही किंवा किमान त्याना अशा समाजात वाढवणार नाही " असं होणार नाही.
असं असतं तर चांगल्या घरात वाईट मुलं आणि वाईट घरात चांगली मुलं निपजली नसती. लोणावळ्याच्या 'मनशक्ती' चे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांनी एक छान उदाहरण दिले आहे. जगात जितकी चांगली, शुरवीर, उद्योगपती, वगैरे कर्तुत्ववान माणसे झाली, त्यातील ९० % लोकांची मुलं 'नालायक' निपजली. याची बरिच उदाहरणं आहेत, सांगणे न लगे.
याचं कारण तरी काय ? त्यांच्या मते, या लोकांचे संस्कार हे लोकांच्या मत्सरापेक्षा कमी पडले. कदाचित मी हा मुद्दा व्यवस्थित मांडू शकत नसेल पण मला ते पटलं. मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष किंवा स्तोत्र यांचा उपयोग आपल्याला कळत नाही. पण हा लोकांचा मत्सर कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तुळशीचं उदाहरण याबाबत उत्तम आहे.
घरातून बाहेर पडतांनाच एखादा व्यक्ती तुमच्याविषयी वाईट बोलत असतो. मुख्य दरवाज्याच्या डाव्या बाजुस तुळस थेवून बघा. जर तुळस जगत नसेल तर तुमचा मत्सर करणारे अधिक, हे त्यावरून कळेल. जोपर्यंत तुळस जगत नाही तोपर्यंत तुम्हाला या मत्सराचा त्रास होणारच. असाच गायत्री मंत्र आणि गव्हाचा प्रयोग आहे. तुम्हाच्या मुलांवर वाईट परीणाम होवू नये म्हणून केवळ तुम्ही चांगल वागून नाही चालणार तर तुमच्या मुलांना मत्सरांपासून वाचवावेही लागेल. त्यासाठी वरील तुळस, किंवा रामरक्षा, श्लोक कामात पडतील.
नुसतं रामरक्षा, शुभंकरोती किंवा मनाचे श्लोक म्हणून घेतल्याने किंवा गर्भसंस्कार केल्याने मुले सुसंस्कृत होतात का? मुले सर्व अनुकरणातून शिकतात, त्यामुळे नुसतं खरं बोलावे, अन्याया विरूद्ध लढावे वगैरे तोंडी उपदेश करून काहीच होणार नाही असं वाटतं.
हे काही अंशी बरोबर असलं तरी पुर्णपणे नाही. या श्लोकांचा निश्चितच उपयोग होतो. लहान मुलं अनुकरणातून वाईट शिकू नये म्हणून त्यांना चांगलं काय आणि वाईट काय हे कळण्यासाठी ह्याच श्लोकांचा उपयोग होतो. हे केवळ शब्द नाही तर एक 'रेझोनान्स' आहे. जगात जितके चांगले विचार असतील ते अश्या वेळी एका ठिकाणी जमा होतात आणि आपल्या 'अव्यक्त' मनावर (sub-concious mind) परिणाम करतात. त्यामुळे बरेचदा गुन्हेगारी पार्श्वभुमी असणाऱ्या भागातील मुलं चांगली निघतात, ते त्यांच्या एका चांगल्या विचाराने.
त्यामुळे परिस्थिती वाईट आहे, आपला कसा निभाव लागेल, असा विचार न करता, ' चांगलं कराल तर चांगलच होईल, भलेही फळ थोड उशीरा मिळेल' हा विश्वास मुलांमध्ये जागवणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी चांगल्या वागण्यासोबतच चांगल्या विचारांची शक्ती ह्या श्लोकांच्या स्वरुपाने द्यायला काय हरकत आहे ?
सौरभ :- या सगळ्या गोष्टींवर श्रद्धा ठेवून काम करणे आणि आपल्या संस्कृतीतील चांगल्या गोष्टी स्वीकारणे, आणि इतरही लोकांना कधीनाकधी हे कळेल हा विश्वास म्हणजे संस्कृतीबद्दलचा आशावादी दृष्टीकोण.