बऱ्याच अंशी सहमत आहे. तुम्ही जसे विचार मनात आणाल तशीच तुमची वृत्ती बनत जाईल. सदैव रडगाणे गाणारी मंडळी चांगल्या परिस्थितीतही रडगाणेच गातात. तुमचे मित्रमंडळ प्रत्येक गोष्टीची बद्धकोष्ठी समीक्षा करणारे असेल तर तुमची वृत्ती हळूहळू तशीच बनत जाईल. भोवतालची परिस्थिती, त्यातून मनात उमटणाऱ्या भावना यातून आपला स्वभाव बनत असतो. 'गारबेज इन, गारबेज आउट' हे संगणकाप्रमाणेच माणसाच्या बाबतीतही खरे आहे. इथे एडी मर्फीची मुलाखत आठवली. त्याच्या यशाचे रहस्य विचारल्यावर तो म्हणाला, "मी निगेटीव्ह विचार, गोष्टी, माणसे यांना सदैव दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो."
हॅम्लेट