१) मला आपल्या प्रतिसादाच्या शेवटी असलेले जवळपास सगळेच निकष मान्य नाहीत -
आपली इच्छा!
२) हे निकष आपण कोणत्या गोष्टींचा विचार करून मांडत आहात, यात प्रमाण व तंत्राचा, संकेतांचा भाग किती, तुमच्या स्वतःच्या स्वतंत्र विचारांचा भाग किती इ. इ. अनेक प्रश्न पडतात.
उर्दू म्हणून एक भाषा आहे ज्यात 'गझल' निर्माण झाली. त्या उर्दू भाषेतील गझलांचे अत्यल्प वाचन केल्यावर माझ्या अजाण व बालक-मनात हे विचार आले.
३) शेरात मांडायला हवे होते असे म्हटले आहेत, हे फारच हास्यास्पद वाटले.
सुदैवच जर लुटले गेले असेल तर 'आता पुढे आणखीन लुटायचे असेल तर भूल देऊ नका' यात काय लुटले जाण्याची शक्यता वाटत आहे हे सांगावेत. समजा माझ्याकडे १० लाख रुपये आहेत, ते कुणीतरी फसवून लुटले अन मला नंतर कळले. माझ्याकडे जर आता काही लुटले जायलाच उरले नसेल तर मी 'मला भूल न देता उरलेले काय लुटायचे ते लुटा' असे म्हणीनच कशाला?
४) बदल सामावून घेणे हे मराठी गझलेचे वैशिष्ट्यच आहे
मान्य! पण उर्दू, हिंदी व मराठी या सांस्कृतिक दृष्ट्या एकाच भूमीवरील भाषा आहेत. तशी इंग्लीश नाही.
५) शेरातून गुर्मी दर्शविली जाणे म्हणजे शेर चांगला नाही, त्याच्या चांगलेपणाचा तो निकष नाही वगैरे सगळा पोकळपणा आहे. असो.
आपणच म्हंटले आहेत की आपल्याला स्वतःला तो शेर आवडला कारण त्यात एक गुर्मी आहे.
६) यापुढील साधकबाधक चर्चा/वाद इ. खाजगीतून झाल्यास सोईस्कर होईलसे वाटते.
माफ करा. मी कुठलीही खासगी चर्चा करू शकत नाही. आपण व्यक्तिगत निरोपातून ही गझल मला पाठवली असतीत तर केली असती. ही गझल आता आंतरजालावर सर्व जगासाठी प्रसिद्ध आहे. तेव्हा त्यावरील जाहीर चर्चेला पूर्णविराम द्यायला लावणे योग्य नाही. आपल्याला जाहीर चर्चा आपल्याकडून थांबवायची असेल तर आपण ते केव्हाही करू शकता.