साहेब,
जरा सबुरीने मी काय म्हणत आहे हे कृपया विचारात घ्यावेत अशी विनंती!
१. गझलेत प्रत्येक शेर वेगळ्या विषयावरचा असू शकतो व असतो हे मला माहीत आहे, मान्यही आहे व हेही माहीत आहे की तो कविता व गझलमधील अनेक फरकांपैकी एक आहे.
आता हा मुद्दा संपला.
आता दुसरा मुद्दा सुरू झाला.
२. गझलेतील अनेक शेर अनेक विषयांवर असले तरी त्याला एक खानदान असते. कसे ते पहाः
मीरची ही गझल पहाः
हस्ती अपनी हुबाबकीसी है
ये नुमाईश सराबकीसी है - निराशा
नाजुकी उसके लबकी क्या कहिये
पंखडी इक गुलाबकीसी है - असफल प्रेमातील प्रेयसीची आठवण झाल्यावर येणारी निराशा
बार बार उसके दरपे जाता हू
हालत अब इज्तिराबकीसी है - प्रेयसी किंवा ईश्वराच्या प्राप्तीमध्ये आलेली निराशा
मै जो बोला कहाकी ये आवाज
उसी खानाखराबकीसी है - निराशा
मीर उन नीमबाज आखोमे
सारी मस्ती शराबकीसी है - असफल प्रेमातील प्रेयसीची आठवण झाल्यावर येणारी निराशा
मुळात निराशा हे इथे खानदान आहे.
आता पहाः
ओव्हन - जुन्या काळाची आठवण
मूल नको - अनैतिकतेला मानणाऱ्या संस्कृतीवर टीका.
मृत्यू - आत्मविश्वास
विठ्ठल - अगतिकता
लुटा - निराशा
मिणमिणता श्वास - असफल प्रेमाची आठवण व निराशा.
जरी अगतिकता व निराशा हे एकच मानले तरी बाकीचे शेर कुठल्या खानदानातील आहेत? वेगळ्या खानदानातील!
आता हा विचार क्रांतिकारक वाटेल खरा! पण ते सांभाळले तर गझल खुलते हेही खरे.
( संस्कृतीबद्दल मी आधीच खुलासा केलेला आहे. )