कवीला जर अनुकूल प्रतिसाद मिळाला तर मिळणारा आनंद शब्दात सांगता येत नाही. हे फक्त कवीपुरतेच मर्यादित नाही. सर्वांनाच अशा अभिप्रायाची नितांत गरज असाते. त्या मुळेच नवे काही करायला बळ मिळते. पण प्रत्येक वेळी अनुकूल अभिप्रायच मिळेल असे गृहित धरणे हे चुकीचेच!
कधी अनुकूल, कधी प्रतिकूल! प्रतिकूल असतील किंवा अभिप्राय अजिबातच नसतील तर कधी कधी निराशा येते अन् ते स्वाभविकदेखील आहे. मी माझ्याच एका कवितेत म्हटले आहे - निराशेने मन कधी ते ग्रासते, धरिते उभारी पुन्हा-पुन्हा /