पण श्रावण हे म्हणजे फारच होइल. २ मिनिटाच्या चित्रफितिकरीता जालाची जोडणी करणं, म्हणजे पैश्याची भाजी अन रुपायाचा मसाला असं काहिसं होइल. (चु. भु. द्या̱. घ्या. ) असो.
ह्या ध्वनीचित्रफितीत काही मतिमंद मुलांवर प्रयोग केले आहेत. या प्रयोगात उजव्या हाताने डाव्या कानाची पाळी तर डाव्या हाताने उजव्या कानाची पाळी पकडून त्यांना उठाबश्या काढायला लावल्या. काही दिवसांनंतर मुलांच्या स्वनियंत्रणात सुधारणा झाल्याचे लक्षात आहे.
दुसरा प्रयोग एका डॉक्टरचा आहे. त्यालाही त्याच्या रोग्याच्या बाबतीत असाच अनुभव आला.
तिसरा प्रयोग न्युरोलॉजिस्टचा आहे. त्याने उठाबश्या काढल्यावर मेंदुत काय बदल होतात यासाठी मेंदु स्कॅन केला, त्यात त्याला लक्षात आले की मेंदुतील काही भाग उठाबश्या काढल्याने अधिक उत्तेजित होतात ज्यामुळे मेंदू अधिक प्रगल्भ होतो. आता तो स्वतः रोज १०-१५ मिनिटे उजव्या हाताने डाव्या कानाची पाळी तर डाव्या हाताने उजव्या कानाची पाळी पकडून उठाबश्या काढतो.
त्याच्या मते, कानाच्या पाळीवर दाब दिला तर मेंदुतिल विशिष्ट पेशी उत्तेजित होतात ज्या मेंदू अधिक ताजातवाना आणि हुशार करतात.
माझा उद्देश हा होता की हे आपल्या पुर्वजांना माहिती होतं का ? जसं सुर्यनमस्कार हा एक पुर्ण व्यायाम आहे असं म्हणतात किंवा इतर योगासनाचे उपयोग आपल्याला माहिती आहे, तसे उठाबश्या काढल्या तर मेंदू तल्लख होतो म्हणून व्रात्य मुलांना ही शिक्षा द्यायचे का ?
अवांतर :- चित्रासारखे ध्वनीचित्रफित जोडायचे तंत्र मनोगतावर आहे काय ?