वाचल्यानंतर नेमके काय वाटले सांगणे अवघड आहे. लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीमध्ये काही वर्षांपूर्वी काश्मिरातील स्त्रियांवर दहशतवादी आणि लष्कर ह्या दोघांकडून कसे शारीरिक आणि मानसिक अत्याचार होतात, त्याचे याची डोळा निवेदन वाचून अंगावर काटा आला होता, त्याची हा लेख वाचून पुन्हा आठवण झाली.
लेखाच्या मांडणीबाबत मात्र मी वरील मतांशी सहमत नाही. कदाचित माझी समज कमी असल्यामुळे असेल पण मला अनेक वाक्यात संदिग्धता जाणवली आणि नेमके काय म्हणायचे आहे हे नीटसे समजले नाही असे वाटले, काही ठिकाणी उल्लेख फार त्रोटक आणि म्हणून समजावयास अवघड वाटले. ह्यामुळे वाचन-आकलनाचे पूर्ण समाधान मिळाले नाही. असो.