रामायण कोणा स्त्री मुळेच घडले असे म्हणायचे झाल्यास माझ्यामते ती स्त्री म्हणजे मंथरा दासी.
पण रामाला वनवासात पाठवण्यामागे फक्त वचंनपूर्ती एव्व्हढाच हेतू होता कि राज्यविस्तार हा ही हेतू असेल?
कारण रामाने वनवासात जी युद्धे केली त्या वेळी तेथील प्रस्थापित सत्ता मोडून काढून ती राज्ये स्वतःच्या अंकीत केली. रामाने वालीवध केला... खरं म्हणजे सुग्रीवापेक्षा वाली जास्त शक्तीशाली होता .. मग रामाने त्याची मदत का घेतली नाही? देशोधडीला लागलेल्या सुग्रीवाला राज्य मिळवून देण्यामागे त्याचा काय हेतू असेल? असं तर नसेल कि वाली सारखा राजा नंतर त्यांच्या अंकीत झाला नसता (कदाचित मित्र झाला असता) पण सुग्रीव हा वालीएव्हढा पराक्रमी नव्हता आणि रामाचा अंकीत म्हणून राहीला असता. तीच गोष्ट रावण आणि बिभिषण यांच्याबाबत... त्याने युद्ध सुरू व्हायच्या आधीच बिभिषणाला लंकेचा राजा म्हणून घोषित केले होते .