कवठे व नाग या दोन्ही कथांचा पाया हा मानवी वैषयिक भावनेत आहे असे मला वाटते. आमराईतील प्रसंगापूर्वीही कवठेच्या नायकाचा अगदी सकाळचा गल्लीतील काकूंसोबतचा संवाद काळजीपूर्वक पाहिला तर त्यात आलेले मंगळसूत्राचे उल्लेख व वेडसर असूनही या मुलाचे लक्ष कुठे जाते अशा अर्थाचा काकूंचा प्रतिसाद हे सूचित करणारा आहे.
येथे थीमऐवजी पाया किंवा त्या अर्थाचा दुसरा शब्द हवा होता.
कैरी ही माझ्या मते सर्वोत्कृष्ट कथा. स्वामीही सर्वोत्कृष्ट. किंबहुना थोडा विचार केला तर डावेउजवे करणे शक्य नाही हेच पटते.