वनवासाची शिक्षा झालेल्या स्त्रीयांनी (स्वेच्छेने वनात राहणाऱ्या ऋषीपत्नी व वनवासी जमातींतील स्त्रीयांनी नव्हे) त्यांच्या वनवासाच्या काळात अपत्य होऊ देऊ नये?
कल्पना नाही. आणखी एक प्रश्न असा की व्यासांचे महाभारत आधी आले की वाल्मिकींचे रामायण? वाल्या कोळी आणि वाल्मिकी या सांगोवांगीच्या गप्पा असणे सहज शक्य आहे.
असो. मी जाणकार नाही, तज्ज्ञबिज्ज्ञही नाही पण मला शंका आहे की व्यास आणि वाल्मिकी यांच्यापैकी ज्याने कोणी आपले महाकाव्य नंतर रचले त्याने वनवासात अपत्य न होऊ देण्याच्या कथेत थोडे वाङ्मयचौर्य केले असावे. नाहीतर, झाले घरात कलह की जा वनात अशी थीम दोन्ही महाकाव्यांत का दिसावी. ह. घ्या.
तसे चौर्य बरेच आहे.
गृहकलह
मित्रप्रेम
नायिकेला तिच्या पित्याच्या पोटचे अपत्य न ठरवणे.
नायकांचे चमत्कृतीपूर्ण जन्म
आणि बरेच.