राम काय कृष्ण काय हे सारे स्वतःच्या अवतारीपणामुळे वलयांकित! आणि देव , अवतार यांना चुकण्याच स्वातंत्र्य नाही!
त्यांनांच काय शिवाजी महाराज , संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि इतर कर्तृत्ववान मंडळी ही प्रत्येक बाबतीत बरोबरच असली पाहिजेत अन्यथा मोठा गहजब माजेल.
चूक करून सुधारण्याचा मानवी हक्क त्यांनी कधीच गमावला!
आम्ही व्यक्तीपूजेत रमायला लागलो तेव्हाच!
म्हणून ते प्रत्येक कृती बरोबर आणि योग्य करत आणि आपण त्यांच्या प्रत्येक वागण्याचे समर्थन करू या!
आणि देवपूजा करू या!
चिकित्सा हे महापाप आहे! ते टाळू या!