एवढा विश्वास कवितेतून शब्दांना मिळावा...
... आणि व्हावे आशयानेही स्वतः त्यांच्या हवाली!
ही कथा एकाच ओळीची...पुढे सरलीच नाही...
'सांगता माझ्या कथेची पूर्ततेआधीच झाली! '
सूर्य अस्ताला निघाला की पुन्हा उदयास आला...
रंगली चर्चा किती ही पाहण्याआधीच लाली!
हे अगदी खास!