क्या बात है ला पर्याय नाही. याबद्दल बहुधा पुलंनीच लिहीले आहे. (चूभूद्याघ्या)
तसेच "गपूच्या वेळेपासून किनई कसस्सच होतय (पुल)", "थालिपीटाचे ताट तसेच खरकटे पडले आहे", "कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर", "दिल-ए-नादान तुझे हुआ क्या है" यांचे कदाचित तांत्रिकदृष्ट्या अनुवाद होऊ शकतील
पण त्यात राम, सीता, सुग्रीव, जांबुवंत यातील रामायणाची कुठलीच कास्ट नसेल.
क्या बात है उस्फूर्तपणे यायला हवे. पल्लवीने दर दोन वाक्यांना क्या बात है म्हणून दाखवून एका सुंदर दादेचे (?) वाटोळे करून टाकले आहे. हे म्हणजे चांगला विनोद सांगितल्याबद्दल भारतरत्न दिल्यासारखे झाले.
हॅम्लेट