'चौफुल्यात किंवा डान्सबारमध्ये बायांना नाचायला लावून त्यांच्यावर दौलतजादा करणारी प्रवृत्ती ही नाच गाण्यात ऐयाशी करणाऱ्या पेशवाईपेक्षा आणि राजेरजवाड्यांपेक्षा फारशी निराळी नाही...'
म.टा. मधील प्रतिमा जोशींच्या लेखातील वरील विधानच त्यांच्या बिनअभ्यासू आणि उथळ विचारांचे प्रतिनिधित्व करते.
आज पर्यंत पेशवाई मेजवानीत बुडाली असा आक्षेप कानावर होता पण राज्य कारभार करण्या ऐवजी 'नाच गाण्यात ऐयाशी' करण्यात पेशवाई मग्न होती हा जावईशोध प्रतिमाताईंना कुठून लागला कळायला मार्ग नाही. मला वाटतं, पेशवाई नाच गाण्यात गुंग असताना पाकिस्तान पर्यंतच्या राजांनी 'आम्ही कंटाळलो बुवा राज्य करून, आता तुम्ही करा राज्य आमच्या प्रदेशांवर.' असे म्हणून राज्याच्या सनदा पेशव्यांच्या पायाशी ठेऊन स्वतः काशीप्रयाण केले असावे.
बाळाजी विश्वनाथाच्या शाहू महाराजांसाठी केलेल्या शिष्टाई पासून, पहिला बाजीराव, नानासाहेब, चिमाजी अप्पा, सदाशिवभाऊ, माधवराव, राघोबादादा, दूसरा बाजीराव पर्यंत सर्व पेशव्यांनी प्रत्यक्ष रणात तलवार गाजवून शिवाजी महाराजांचे राज्य उत्तरेत थेट दिल्ली पर्यंत पसरविले. याकडे ब्राह्मणद्वेशी, सोयिस्कर काणाडोळा करून, लोकशाहीच्या भाषण स्वातंत्र्याचा गैरवापर करीत ब्राह्मणांना सर्व वाईट गोष्टींसाठी जबाबदार धरत आहेत.
ब्राह्मणांनी गप्प बसून सहन करीत बसू नये.