कुठल्याही रस्त्याला, चौकाला किंवा संस्थेला नाव देण्याआधी खालील गोष्टी
विचारात घेतल्या पाहिजेत. तो रस्ता त्या माणसाच्या स्मरणार्थ बांधला आहे
का? तो रस्ता व्हावा म्हणून त्याने काही श्रम-प्रयत्न केले आहेत का?
त्या रस्त्यावर त्या व्यक्तीने स्थापन केलेली एखादी समाजोपयोगी संस्था आहे
का? त्या रस्त्यासाठी त्याने काही देणगी दिली आहे का? असे नसेल तर त्या
रस्त्याला लोक कधीही त्याच्या नावाने ओळखणार नाहीत, अगदी कितीही वेळा त्या
रस्त्याने गेले तरी!
'अप्पा बळवंत' ही व्यक्ती नेमकी कोण होती याबद्दल मला आजतागायत यत्किंचितही कल्पना नाही, आणि विचारले असता अप्पा बळवंत चौकाचा पत्ता व्यवस्थित सांगू शकणाऱ्या रस्त्यातल्या शेंबड्या पोरालाही तशी ती बहुधा नसावी, परंतु मला काय किंवा त्या शेंबड्या पोराला काय, पुण्यात अप्पा बळवंत चौक कोठे आहे हे नेमके माहीत आहे आणि त्या चौकास मी आणि ते शेंबडे पोर यांसह तमाम दुनिया (म्हणजे समस्त पुणेकर) 'अप्पा बळवंत चौक' या (आणि याच) नामाभिधानाने ओळखते, हे महत्त्वाचे.
मुंबईत गिरगावातला कावसजी पटेल तलाव बुजवला जाऊन शंभराहून अधिक वर्षे झाली असावीत, आणि 'कावसजी पटेल' म्हणजे नेमके कोण हे आजच्या सामान्य गिरगावकराला माहीत नसावे, परंतु आजही 'सीपी टँक' विचारले असता सामान्य गिरगावकर पत्ता व्यवस्थित सांगत असावा.
अवांतरः मुंबईतच 'काळा घोडा' विचारले असता बस कंडक्टरसह कोणीही इच्छित स्थळी कसे पोहोचावे हे बहुधा सांगू शकेल. त्या काळ्या घोड्यावर नेमके कोण आरूढ होते याबाबत कोणी खात्रीलायक माहिती देऊ शकेल काय?