सच्चेपणाची व्याख्या वाचली.
आपल्याला जे अनुभव आले ते असे लिहिणे की ते लिहिल्यानंतर ते फक्त आपले अनुभव न राहता एक प्रमेय, एक सार्वजनिक व्यथा, एक सार्वकालीन सत्य, एक कुणालाही नुसते वाचून अनुभवता येईल अशी घटना होणे!
आपण असे म्हणता, तेच ग. दि. मांच्या बाबतीत थोडेसे उलटेही लागू पडते.
म्हणजे, जो सार्वजनिक अनुभव, व्यथा इ. आहे, तो त्यांनी 'स्वतःला त्या ठिकाणी पूर्णपणे ठेवून' स्वतःचा अनुभव केला. आणि मग कविता रचली. (मुद्दाम गीत म्हणत नाही, कारण कवितेचा मूळ गूण हाच ती 'गेय' म्हणजे गाता येण्याजोगी असणे असा आहे. )
असा सच्चेपणा गदिमांच्या किती रचनांमध्ये आहे याचा थोडासा अंदाज असल्यामुळे
माझे वैयक्तिक मत असे, की दुसऱ्याच्या रचनेतील 'सच्चेपणा' हा दुसरा कुणीही ठरवू शकत नाही.
तुम्ही जी दोन उदाहरणे दिली आहेत, त्यात गालिबचे उदाहरण निः संशय वरच्या दर्जाचे आहे. पण म्हणून त्या कुणा अज्ञाताच्या काव्यात (ते साधे असले तरी) सच्चेपणाच नाही असे आपण म्हणू शकत नाही. कारण तीही नवनिर्मिती आहे, आणि स्वतंत्रपणे अभिव्यक्त होणारे असेच काव्य आहे.
मी भट आणि ग. दि. मा. ही तुलना करत नव्हतो, परंतू तुमच्या प्रतिसादामध्ये त्यांचा उल्लेख असल्याने मीही त्यांचा उल्लेख केला.
कविता ही वैयक्तिक अभिव्यक्ती असते. (ग. दि. मा गीते लिहीत म्हणजे एखाद्या विशिष्ट परिस्थितीवरची कविता करीत.)
जसे तुम्ही उदाहरणात म्हटले- की एकच विषय दोन जणांनी लिहिला- (दोघेही कवी आहेत असे गृहित धरून, किंबहुना, दोघांना मुद्दाम एखादा विषय देऊन कविता लिहायला सांगितली) तरीही ती त्यांच्या व्यक्तिगत अनुभवांमुळेच वेगवेगळी असेल.म्हणूनच ती सच्चीच असेल.
मला स्वतःला भट आणि ग. दि. मा. दोघेही श्रेष्ठच वाटतात. किंबहुना दोन अतिशय चांगल्या गोष्टी, आणि चांगल्या व्यक्ती ह्यांच्यात तुलना होऊच शकत नाही.
असो, इथेच थांबतो.