आज तर या निष्कर्षाप्रत यावेसे वाटते की, ज्या ज्या व्यक्तींनी रूढ असे साचे तोडले, त्यांनीच आपल्याला नवा मार्ग दाखवला आहे.

---- हे दोघेही करतात, समाज सुधारक आणि समाज विघातक. समलैंगीक हे समाजसुधारक की विघातक?

 ज्या गोष्टीला विकृत असे म्हण्टले जाते आहे, काही व्यक्तींना ती गोष्ट श्वासोच्छवासासारखी आहे.

---- म्हणजे श्‍वासोच्छवासासारखे [ अगदी तादात्म्य साधून ] समाजविघातकी , चोऱ्या, दरोडे, खून, मारामाऱ्या इ. कामे करणारी मंडळी, या समलैंगीक माणसांइतकेच निष्पाप ?

हे एक सत्य आहे. बस्स. छोट्या प्रमाणात का होईना, पण समाजाचा एक भाग हा असा आहे.

---- अनेक दुर्धर रोग देखील एक सत्यच असतात, सुरुवातीला छोट्या प्रमाणात का होइना, पण समाजाचा एक भाग असतात, म्हणून उपचार न करवून घेणे कितपत योग्य?

हे संबंध वैध आहेत असे समजतो.

---- वैधतेचे निकष काय व कोणते? पाश्चिमात्य लोकांनी ठरवले म्हणुन?

बहुतांशी पाश्चात्य देशात त्यांना जी मान्यता आहे तशी भारतात त्याना कायदेशीर मान्यता हवी हे मत व्यक्त करतो.

---- इतिहास, भुगोल, संस्कृती या बाबतीत, पौर्वात्य जवळचे की, पाश्चिमात्य? एव्हढेतरी नक्कीच निर्विवाद लिहावे.

पाश्चिमात्यांचे अनुकरण / अंधानुकरण , हा साचेबद्धपणा [स्टिरीयोटाइप] मानसिकतेचा उत्तम नमुना आहेच.