या सर्व लेखनप्रपंचाचा उद्देश एवढाच की, भारतात अशी वैविध्यपूर्ण प्रदर्शन आयोजित केली तर विविध विषय रंजक पद्धतीने जनमानसासमोर येऊ शकतील.

इतरत्र पाहिलेल्या चांगल्या गोष्टी आपल्या समाजासाठी कशा तऱ्हेने उपयोगात आणता येतील असा विचार करणे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी वाटते.