या चर्चेचा प्रस्ताव मुंबई वा पुणे यातले रहायला कुठले चांगले, असा शहरासंबंधी होता. त्यावर तिथल्या लोकांचे स्वभाव, वैचारिकता, बौद्धिक आधिष्ठान वगैरे मुद्दे येऊन चर्चा वाहवत गेली. असो. जाता जाता एक किस्सा सांगतो.
आमचे पुण्याचे एक नातेवाईक, दर भेटीत मुंबईच्या हवेवर टीका करायचे. लोकल प्रवास, घाम, गर्दी यावर यथेच्छ टीका चालू असायची. आम्ही ते कधी मनावर घेतले नाही, की मुंबईच्या या हवेला आम्ही जबाबदार नाही, हे सांगण्याचा कधी प्रयत्नही केला नाही. पुढे, पुण्यात उकाडा प्रचंड वाढल्यानंतर ते एकदा मे महिन्यात आमच्याकडे आले होते. आमचे घर सहाव्या मजल्यावर असल्यामुळे दुपारी थंड, झुळझुळ वारा आत येतो. दुपारी ते पाहुणे वामकुक्षी करायला पहुडले असताना त्यांना पंख्याचा वारा सोसेना. तेंव्हा त्यांनी पंखा बंद करायला सांगितला. आणि म्हणाले, "तुमचे घर तर महाबळेश्वर वाटताय!
आम्ही तरीही काही बोललो नाही!