ही गोष्ट सत्य आहे.  दूरदर्शनवर जेव्हा जेव्हा भारतातल्या प्रमुख शहरांचे हवामान दाखवतात, तेव्हा तेव्हा तुलनात्मकदृष्ट्या सर्वात सुखद हवामान मुंबईचे असते हे कुणाच्याही लक्षात येईल. जी माणसे मुंबईला कधीच येत नाही तीच मुंबईच्या हवामानाबद्दल तक्रार करतात.  अस्सल मुंबईकर कधीही करत नाहीत. उलट पुण्यातली दुकाने दुपारी बारा ते चार का बंद असतात यावर विचार केला तर पुण्याचे दुपारचे हवामान किती वाईट असते याची कल्पना येईल. आम्ही पुण्याच्या ज्या भागात राहतो त्या भागात दुपारच्या वेळात शहरी बसेसची संख्या अत्यंत रोडावलेली असते. कारण प्रवासी मिळत नाहीत.