कालौघात विस्मरणात गेल्यासारख्या आर्या या काव्यप्रकाराची पुनः प्रचिती देण्याच्या या उपक्रमाबद्दल अभिनंदन
आणि धन्यवाद. आपण सादर केलेल्या आर्या वाचून मन पुन्हा शालेय जीवनात गेले. अतिशय उत्कट गेयता लाभलेला
हा काव्यप्रकार त्याकाळी शिक्षक तितक्याच मधुर गेयतेने म्हणून दाखवीत आणि शिकवीत. आपला लेख वाचून त्या काळी
अभ्यासलेली, पण आता पार विस्मृतीत गेलेली, आर्या प्रकारातल्या एका कवितेच्या कांही ओळी अंधुकशा आठवतात,
त्या अशा-
रथचक्र उद्धरूं दे श्रुतिशास्त्रज्ञा महारथा कुलजा ।
साधू न हाणिती रिपुला१ अयुधायुध व्यथाकुल हा ॥ (१इथे 'रिपुला' आहे किंवा 'अरिला' असेही असेल)
कौरव पांडवामध्ये झालेल्या धर्म्युद्धांत जेंव्हा कर्णाच्या रधाची चाके जमिनीत फसली, त्यावेळी त्याचेवर शस्त्र उगारलेल्या
अर्जुनाला उद्देशून कर्णाने म्हटलेल्या या ओळी आहेत. मला आज ही कविता पुरती आठवत नाही आणि ज्या पुस्तकात
ही कविता होती ते पुस्तकही गहाळ झाले आहे.
आपल्या कडे अथवा अन्य मनोगतीकडे ही वामन पंडितांची कविता संग्रही असल्यास कृपया मनोगतवर द्यावी.
आत्ता लिहिता लिहिता आणखी एक आर्या आठवली-
हंसे मुक्ता नेली मग केला कलकलाट काकांनी ।
हांकांनी नभ भरिले जाय सुरांच्याही नाद तो कानी ॥
इथेही विस्मरणाचा तोच घोटाळा आहे. आर्या आठवली पण मूळ कविता आणि संदर्भ.......?????