"आधी हाताला चटके , तेव्हा मिळते भाकर ! " ही उक्ती कीती खरी आहे हे नेहेमी पोळी शिकताना जाणवले मला.
रोहीणी तुझे पोळी पुराण मलाही भूतकाळात घेवून गेले.मलाही नीट पोळी जमायची नाही तेव्हा आज्जी म्हणायची कणीक खुप रगडायला पाहिजे मग मऊसुत पोळी होते.मनापासून शिकत गेले की जमते मस्त पोळी.आणि मलाही जमली!
वरवर पाहता साधी वाटणारी ही पोळी सगळ्यांना जमतेच असे नाही. तुझा लेख आवडला. पोळी करता करता आज आठवला आणि पोळी टम्म फ़ुगली!