भागवत पुराण हे चाणक्य, चंद्रगुप्ताच्या (इ.स.पू. ३ रे शतक) आधी हजारो वर्षे वगैरे अजिबात लिहिले गेलेले नाही. माझ्या मते पुराणांच्या निर्मितीचा काळ हा साधारण इ.स. ४ थे शतक ते १९ वे शतक असा आहे. पुराणे हजारो वर्षांपूर्वी लिहिली गेली आहेत असा आपला (आपल्या सर्वांचाच) उगाचच एक समज आहे.
चंद्रगुप्त काळात भारतात मूर्तीपूजा अस्तित्त्वातच नव्हती, तर ती त्याच्या आधी हजारो वर्षे कुठून असणार? त्यामुळे भागवत पुराण खूप जुने आहे ह्या मुद्द्यात तथ्य नाही.
आपला प्रतिसाद पाहिल्या पाहिल्या मला माहित असलेली व आठवत असलेली त्रोटक माहिती आत्ता दिली आहे. याबाबतची अधिक माहिती मिळवून ती लवकरच देईन.