आर्येचे लक्षणच असे आहे की-

यस्या: प्रथमे पादे द्वादश मात्रास्तथा तृतीयेऽपि । (पहिल्या आणि तिसऱ्या चरणात १२ मात्रा)

अष्टादश द्वितीये, चतुर्थके पञ्चदश सार्या ॥ (दुसऱ्यात १८, चौथ्यात १५ )

असे असल्यानेच आमच्या शिक्षिका आर्येला पायमोडके वृत्त असे मजेने म्हणायच्या.

गीती आणि उपगीतीचे लक्षण देत आहे.

आर्योत्तरार्धतुल्यं प्रथमार्धमपि प्रयुक्तं चेत्

छन्दसि ताम् 'उपगीतिं'प्रकाशयन्ते महाकवयः ।

(आर्येच्या उत्तरार्धासारखाच जिचा पूर्वार्ध असतो, तिला महाकवी उपगीती असे म्हणतात. अर्थात्, १२-१५, १२-१५ हे उपगीतीचे लक्षण )

आर्यापूर्वार्धसमं द्वितीयमपि यत्र भवति सा 'गीति:' ।

(आर्येच्या पूर्वार्धासारखाच जिचा दुसरा भाग असतो, ती गीती. म्हणजेच, १२-१८, १२-१८ हे गीतीचे लक्षण )

त्यामुळे, मूळच्या आर्येच्या लक्षणांवरूनच ह्या दोहोंची लक्षणे सांगितलेली असल्यामुळे, त्यातील साधर्म्यामुळे गिती, किंवा उपगीतीला आर्या समजण्याचा घोळ होऊ शकतो.

- चैतन्य दीक्षित.