धर्मामध्ये जर असे सांगीतले असेल की 'कबूलीकेंद्रात' जाऊन आपली पापे वाचून पश्चात्ताप व्यक्त केला की पापांच्या परिणामाची तीव्रता कमी होणे, माणसाचे 'चारित्र्य-स्वच्छीकरण' होणे वगैरे शक्य आहे, तर तेथील धर्मगुरूने फक्त हेच म्हंटले पाहिजे की 'बेटा, तू खरे बोललास हे चांगले झाले, जे केलेस ते वाईट आहे, पुन्हा करू नको व स्वतःच योग्य वाटेल ते प्रायश्चित्त घेऊन त्या पापातून मुक्त हो'.

मला असे वाटत नाही की 'त्या स्वरुपाचे' ( म्हणजे आतंकवादी, आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुन्हेगार, काही वादग्रस्त नेते) वगैरे कबूली द्यायला जातील अन गेलेच तरी या गोष्टींचीपण कबुली देतील.

पण तसे गृहीत धरले तरीही , समाजाच्या 'लार्जर' इंटरेस्टसाठीसुद्धा माझ्यामते धर्मगुरूने ते वृत्त जाहीर करणे योग्य नाही कारण ते त्याचे कर्तव्य नाही. त्याचे कर्तव्य आहे माणसाला शुद्ध करणे.

सामाजिक स्वास्थ्यासाठी इतर एजंन्सीज आहेत. त्यांनी आपल्या कामात अपयशी होणे व धर्मगुरूच्या बातमीपत्राकडे डोळे लावून बसणे गैर वाटते. अर्थात, पुढे होऊ घातलेल्या घटना जर धर्मगुरूला समजल्या ( जसेः या या तारखेला या या ठिकाणी बॉंब उडवून हानी होण्याची शक्यता आहे वगैरे स्वरुपाच्या ) तर मात्र त्याने ते जाहीर करावे असे मला वाटते.

चर्चा प्रस्ताव चांगला आहे. दिलचस्प आहे.

मला तर आता असे वाटायला लागले आहे की मनोगतावरील काही चर्चा-प्रस्तावामुळे समाजातील काही वृत्ती, काही माणसे, काही संघटना, सुधारणेही शक्य व्हावे.

अभिनंदन!