दुवा क्र. १ येथे हे वाचायला मिळाले:
१ फेब्रुवारी तारीख उजाडली तशी माझी दिवसांची उलटि मोजणी सुरु झाली. उत्तर भारताची सफर करायला मी अधीर झालो होतो. मुळात वैष्णोदेवीच्या निमित्ताने उत्तरेत जात होतो, म्हणुन परत येताना अमृतसर – दिल्ली– मथुरा - आग्रा असे करुन यायचे ठरवले. ६ तारखेला मुंबईहुन निघालो वैष्णोदेवी ला म्हणजे जम्मुला.मुंबईहुन श्री. दुग्गल दरवर्षी किमान ५००-६०० जणांना घेउन हि यात्रा करतात. देवीवर त्यांची अपार श्रध्दा आहे. ना नफा - ना तोटा तत्वावर ते हि यात्रा नेतात. अतिशय सुंदर व्यवस्था असते. विशालने याबद्दल सांगितले तेव्हाच जायचे हे नक्कि झाले. बर कटराला जाईपर्यंतचा खर्च म्हणजे सिंगल तिकिट – जातानाचे गाडितले जेवण/सुकामेवा/आयस्क्रीम/फळे/चहा/नाश्ता – कटरात रहायची सोय- व तिथले२ दिवसांचे जेवण/चहा-नाश्ता यांचा एकुण खर्च यावर्षी १९००/- फक्त आला होता. थोडक्यात फक्त वैष्णोदेवी ला जाऊन येण्याचा खर्च २५००/- पर्यंत आटपु शकतो. या शिवाय दुग्गलांनी एक चांगली मोठी ट्रॅव्हल बॅग, एक ताट, भांडे, एक नॅपकिन, आणि ब्रश-पेस्ट-साबण असे टॅव्हलिंग किट दिले होते ते वेगळेच. थोडक्यात घरुन बुड हलवुन बांद्रा टर्मिनसला गाडित टेकवायचे कष्ट तेव्हढे घ्यायचे होते.