Anandghan येथे हे वाचायला मिळाले:

लवकरच महाराष्ट्र दिवस येत आहे। या निमित्याने मी मराठी दिवस या विषयावर लिहिलेला लेख देत आहे. दर वर्षी मराठी दिवस पाळला जातो. पण कोणते लोक आणि कशा पध्दतीने तो साजरा करतात ते कांही समजत नाही. माझ्या परिसरात तरी कसलाच उत्सव किंवा उत्साह मला कधी दिसला नाही. मातृभाषेच्या अशा वेगळ्या दिवसाची गरज तरी कां भासावी हा सुध्दा एक प्रश्न आहे. पण या बाबतीतले एकंदरीत औदासिन्य पाहता कांही लोक सातत्याने मराठी भाषेच्या भविष्याबद्दल जी चिंता व्यक्त करत असतात ती खरी वाटू लागते.

सन १९२२ मध्ये कवीराज माधव ज्यूलियन यांनी लिहिलेल्या "मराठी असे आमुची मायबोली" या सुप्रसिध्द कवितेत "जरी आज ही राजभाषा नसे"अशी तत्कालिन परिस्थितीनुसार वेगळ्या प्रकारची खंत व्यक्त ...
पुढे वाचा. : मराठी दिवस