दुवा क्र. १ येथे हे वाचायला मिळाले:
हल्ली वर्तमानपत्रात आपण वंशावळ, अमुक एका घराण्याचे संमेलन (म्हणजे अभ्यंकर कुलसंमेलन, दामले, रानडे कुलसंमेलन वगैरे) भरणार असल्याच्या बातम्या वाचतो. एकाच आडनावाच्या (परंतु प्रत्येकाचे नाते असेलच असे नाही) मंडळींचेसुद्धा संमेलन होते. ज्यांना नाती जपणे महत्त्वाचे वाटते अथवा ज्यांना अधिक ओळखी करून घ्यायच्या असतात किंवा वाढवायच्या असतात अशी मंडळी आवर्जून अशा संमेलनाला उपस्थित राहतात.