रत्नपारखींनी दिलेले गुण तर लागतातच. पण तुम्ही कितीही प्रामाणिक असलात तरी सरकारी मागऱ्या लोकांना तोंड द्यावेच लागते. त्यामुळे लाच देणे, भेटवस्तू देणे, अशा लोकांचा राग न येऊ देता त्यांच्याशी गोड गोड बोलणे असे गुण अंगी बाणवावे लागतात. बाणेदारपणा, स्पष्टवक्तेपणा, ताठ कणा वगैरे मराठी (अव)गुण सोडून द्यावे लागतात.
नोकरीत तुम्हाला एकच साहेब असतो. धंद्यात प्रत्येकालाच साहेब म्हणावे लागते.
नोकरीत घरी आल्यावर फारसे टेन्शन नसते. धंद्यात अमर्याद टेन्शन सहन करण्याची क्षमता लागते.
हे जमत असेल तरच धंद्यात उतरावे.