पुस्तकायन येथे हे वाचायला मिळाले:
मला आठवतही नाही तेंव्हापासून मी गाणी ऐकतेय. 'गोरी गोरी पान फुलासारखी छान' पासून ते 'एका तळ्यात होती बदके पिले सुरेख' पर्यंत अनेक गाण्यांनी माझं बालपण सजवलं. गीतरामायणातलं 'सेतू बांधा रे सागरी' ऐकायला खूप आवडायचं. 'देवहो बघा रामलीला ,भूवरी रावणवध झाला' हे गाणं मी 'देवहो पहारा मलीला भूवरी रावणवध झाला' असं म्हणत असे. हे ऐकून बाबांना जाम हसू यायचं पण त्यात काय मोठ्ठा विनोद झाला आहे हे काही माझ्या लक्षात येत नसे. हळूहळू ही सगळी गाणी लिहिणाऱ्या जादुगाराचं नाव ग दि माडगूळकर आहे ही माहिती मिळाली. मी शब्दांशी खेळायला सुरुवात खूप उशीरा केली त्यामुळे गदिमांच्या शब्दांचं गारुड माझ्या मनावर व्हायला अंमळ उशीरच झाला. पण गोरी गोरी पान मुळे मी त्यांच्यावर एक्दम खूश होते हे खरंच. नंतर मात्र, 'असा बालगंधर्व आता न होणे' पासून ते अगदी 'मला कशाला मोजता मी तो भारलेले झाड' पर्यंत त्याची अगणित कविता - गाणी ऐकून किती साध्या शब्दात ते किती सहजतेने प्राण ओतत असत हे जाणवलं. त्यांचं लेखन वाचणाऱ्याला फार सोपं पण लिहायला अवघड आहे हे ही जाणवलं. 'जोगिया' कविता वाचल्यावर तर त्यातल्या शब्दांचा अर्थ समजण्याच्याही आधी त्यातल्या शब्दांच्या नादमाधुर्याने मला मोहिनी घातली.
...
पुढे वाचा. : कल्पवृक्ष