खुपसर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद..!!

@सतीश रावले, उद्योजक होण्यासाठी मराठीपणा सोडून द्यावा?? का बरे? २ प्रश्नाचे उत्तर पटले.
यशाचा मार्ग 'प्रेम' व 'प्रणय' यातूनच जातो असा माझा (अजूनतरी) 'समज' आहे. (हा हा, नवा शोध.)

@भारत रत्नपारखी, सस्मित, अहंमन्य,
   टिपणे, प्रतिसाद आवडला,  उर्वरीत टिपणाच्या प्रतीक्षेत.

@सौरभ,
   तुम्ही मांडलेला मुद्दे "सोशल नेटवर्क, निरिक्षण" महत्त्वाचे आहेत, काँटॅक्टस मध्ये गुंतवणूक करा (म्हणजे नेमके काय करावे याचे उत्तर अपेक्षीत आहे.)

@हरणटोळ अगदी मला अपेक्षीत असलेले प्रश्न मांडले तुम्ही. धन्यवाद..!!
त्यामुळे लाच देणे, भेटवस्तू देणे, अशा लोकांचा राग न येऊ देता त्यांच्याशी गोड गोड बोलणे असे गुण अंगी बाणवावे लागतात. बाणेदारपणा, स्पष्टवक्तेपणा, ताठ कणा वगैरे मराठी (अव)गुण सोडून द्यावे लागतात.

हे अवगुण आहेत? मला तरी पटत नाही. सदविवेकबुद्धिला सोडचिठ्ठी दिलीच पाहीजे का? आपले मराठी संस्कार, तत्त्वे, निष्ठा कायम
ठेवून व्यवसायिक होणे शक्य नाही का? सदविवेकबुद्धिला सोडचिठ्ठी देण्यापेक्षा दुसरा मार्ग नाही का?

@भूषणकाका तुमचे ही आभार..!!
हे मान्य की मराठी माणसांनी आपल्या मानसिकतेनुसार नोकरी करावी, यावर माझा आक्षेप नाही, माझा मुळ प्रश्न असा की मराठी माणसांने उद्योजक होण्यासाठी काय करावे? (अर्थात ज्याची अशी महत्वाकांक्षा असेल त्यांनी)
मागील चर्चेत "इतर भाषिकांच्या तुलनेत मराठी माणूस व्यावसायिक दृष्ट्या मागेच पडतो" हे विधान कशासाठी?

 मराठी माणसांनी उद्योजक व्हायलाच पाहिजे असे का बरे? करुदेत की नोकऱ्या? मराठी माणसांना उद्योजक नसल्यामुळे कसले प्रॉब्लेम्स येत आहेत?

काका, माफ करा. पण तूमचे मनोगतवरील काही प्रतिसाद वाचून, तुम्ही दुटप्पी भुमिका मांडत आहात असे वाटते.