"दुकानात सर्वात दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट असेल तर ती म्हणजे गिऱ्हाईक." हे पुलंच निरिक्षण बरच काही सांगून जातं.
माझ्या मते उद्योजक बनयचे असेल तर साहस आणि चिकाटी, सतत काम करण्याची इच्छा आणि येणारा पैसा गुंतवत राहणे खुप महत्त्वाचे आहे. डी. एस. कुळकर्णी यांच्या मुलाखतीत 'प्रेझेंटेशन' हाही एक महत्त्वाचा मुद्दा वाटला. आणि हो कितिही काही झालं तरी मी यशस्वी होणारच हा आत्मविश्वास.
पैसे खाउ घालणे हे नेहमीच चालत नाही, बरेचदा त्याशिवायही काम चालत. थोडक्यात, डोक्यावर बर्फाचा अन जिभेवर साखरेचा खडा असणं खुप आवश्यक. बाकी मराठीपणा (ताठ बाणा वगैरे) थोडा बाजुला ठेवणे आवश्यक वाटते. प्रा. संजय यांची मतं नेहमीप्रमाणेच हटके आणि मुद्देसुद आहेत त्याला मी सहमत आहे.
मराठी माणसं उद्योग करू शकत नाही हे विसरून जावं अन बिंधास्त सुरुवात करावी. पैसे किती मिळतात यापेक्षा उद्योग किती वाढीला लागतो (टर्नओव्हर) हे माझ्या मते जास्त महत्त्वाचं. आणि एक नोकरी करून घर बऱ्यापैकी
चालवणारा असेल तर दुसऱ्याने उद्योग सुरू करायला मुळिच हरकत नाही.
चुकत असल्यास प्रतिसादात कळवावे.
चांगला मुद्दा मांडल्याबद्दल अभिनंदन.