माणसाची मूळ आस स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य म्हणजे मी माझे आयुष्य चाकोरीत जगणार नाही ही अभिप्सा. मी अनेक पर्याय उपलब्ध असलेले आयुष्य जगीन, भूक लागल्यावर जेवीन, झोप आली की झोपीन, एक छंद म्हणून काम करीन, आणि एक तरी छंद जोपासीन, खेळ हा माझा रोजचा दिनक्रम असेल. असे जगायचे असेल तर नोकरी करता येणार नाही, स्वतःचा व्यवसायच हवा.
मी पहिल्यांदाच म्हंटलं आहे की तुम्ही आर्थिक दृष्ट्या यशस्वी होता की नाही हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे कारण सगळं जगच पैश्याच्या मागे आहे, तुम्ही निष्कारण रॅट रेस मध्ये पडाल. शिवाय पैसा आला तरी जगण्याच्या नजाकतीचा अंदाज येतोच असे नाही. मी स्वतः व्यावसायिक आहे, माझे अत्यंत श्रीमंत क्लायंटस आहेत आणि मी त्यांच्या बरोबर रात्रंदिवस जगलेलो आहे. या सगळ्या प्रोसेस मधून मी गेलेलो आहे. त्यामुळे दिवसाचे काँपोझीशन तर बदलायचे (धंदा किंवा व्यवसाय करून) आणि मिळालेल्या फुर्सतीचा आयुष्य फुलवायला उपयोग करायचा असा अप्रोच हवा.
माणसाचे मन चार वर्णात विभागलेले आहे (ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र). मनाचा ब्राम्हण भाग विचार करतो, वैश्य आर्थिक मोजमाप दाखवतो, शूद्र धोके दाखवतो आणि क्षत्रिय सहस करतो. हे सगळे मनाचे उपयोगी भाग समजा, सगळ्या मनाचा एकसंध उपयोग करा. स्वतःला मनाच्या एका विभागात बसवणे म्हणजे बंधन यातून न्यूनगंड निर्माण होतो. नुस्ता वैश्य केवळ पैश्याच्या मागे लागतो, क्षत्रिय कलहाची संधी शोधतो, ब्राह्मण चर्चा करत रहतो आणि वैश्य भित्रा माणूस होतो. स्त्री असाल की पुरूष, संपूर्ण व्यक्ती व्हा, आयुष्य हा उत्सव आहे, आणि मी तुमचाशी शेअर करतो आहे, मी सगळ्या धोक्यातून आणि शक्यतातून जगलो आहे, आयुष्य महत्त्वाचे आहे, पैसा किती आहे या पेक्षा तो वापरता कसा यात तुमचे कौशल्य आहे. साहस करा आणि मजेत जगा. संजय