अद्वैतुल्लाखान,

मुद्दा १) लिपी ही आपली संस्कृती असते, तिच्यात कोणताही मूलगामी बदल करण्याचा विचारसुद्धा मनात आणणे हा संस्कृतीद्रोह आहे.

उत्तरः आपल्या संस्कृती बद्दलच्या भावनांना माझ्या प्रतिसादातील व्यक्तव्यामुळे धक्का लागला हे जाणून मला वाईट वाटले. कृपया शांत व्हा! आणि ह्या <दुवा क्र. १> दुव्यावरील लेख वाचावा. सुधारणा ह्या होतच असतात, होत आल्या आहेत. ब्राम्ही लिपीपासून विकसीत होत देवनागरी व देवनागरी पासून सध्याची बाळबोध लिपी आकारत आलेली आहे. दुवा दुवा क्र. २ 

मुद्दा २) सावरकरांचे ही विचार असलेला दुवा मला इथे द्यायचा होता. पण तो वेळेअभावी मिळाला नाही.

मुद्दा ३) लिपी सुधारण्याबाबत इतर भाषक समाज विचार करीत आहेत. हे आपल्याला माहीत आहे हे जाणून थोडं बरं वाटलं. गुजराती भाषकांनी ही आपल्या लिपीत सुधारणा करीत आहेत. <दुवा क्र. ३> हा दुवा वाचावा. बदलाचे वारे समजून घेण्याचा प्रयत्न करावा. मल्याळी  व गुजराती समाजाने लिपीत सुधारणेसाठी बदल का करायचे ठरवले हे जाणून घ्या. ह्या समाजातील लोकं असा व इतका विचार करतात व ते विचार प्रत्यक्षात आणण्याचे धाडस ही करतात.

वरील दुवे वाचून समजून झाले की जरूर प्रतिसाद ध्या. तुमच्या उत्तराच्या प्रतीक्षेत मी आहे.

चर्चेचा विषय वेगळा जरी असला तरीही माझ्या प्रतिसादाकडे दुर्लक्ष न करता प्रत्युत्तर दिल्याबद्दल मी आपला आभारी  आहे.

- सतीश रावले