सर्वांचे खूप धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल..

भूषण तुमचे विशेष आभार इतकी सविस्तर प्रतिक्रिया दिलित म्हणून...

मतल्यात भावनेची त्रीव्रता अधिक उंची गाठणारी हवी होती पटले.. मतला परीपूर्ण करण्यात मी कायम मार खातो

कवडसे मध्ये कवी हे म्हणतोय तू रोज जशी येतेस तशी फक्त गचीवर सकाळी कायम येत जा म्हणजे झाले... माझी अजून काही अपेक्षा नाही तू एवढी साधी गोष्ट जरी केलीस तरी त्याने मी आपोआप आनंदी होईन

शेवटच्या शेरात कवीला पाऊस हा नभाच्या मालकीचा (देवाचे देणे) आहे हे मान्य आहे तेव्हा तो आपल्याला फारसा मिळणार नाहीच (तो थोडेसेच बरसणार) पण थोडा जरी बरसला तरी तो आत पर्यंत पोहचूदे असे म्हणायचे आहे.. बघा पटतेय का?