मराठी माणूस व्यवसाय करूच शकत नाही हा गैरसमज पहिला दूर केला पाहिजे. अनेक मराठी कुटुंबात आपला मुलगा 'साहेब' व्हावा असे पालकांना वाटत असल्याचे संस्कार मुलांवर केले जातात. ते चुकीचे आहे.

ज्याला आयुष्यात शिक्षण घ्यायला जमत नाही त्याने व्यवसाय करायचा असतो ही मानसिकता दूर करायला हवी.

तसेच मराठी माणसांनी त्यांना लागणाऱ्या गोष्टी मराठी माणसांकडूनच खरेदी करण्याचा निर्णय घेऊन तो अंमलात आणावा. तरच मराठी माणूस व्यवसायात टिकू शकेल.

गुजराती कधी त्याच्यासमोर गुजराथ्याचा पर्याय असतांना मराठी माणसाकडून माल घेतो का? पण आपल्याला हे नाही जमत.

दादरमध्ये सहस्रबुद्धे आणि मंडळींकडे किराणा जिन्नस घेण्याऐवजी मराठी माणूस खिमजी चापशी शाह च्या दुकानाचे उंबरे झिजवतो. आणि सहस्रबुद्धे रिकामे राहतात आणि दुकान चालत नाही म्हणून एचडीएफसी बँकेला महिना वीस हजार रुपये भाड्याने देतात.

तिथे खिमजी चापशी शहा मराठी भूमीत येऊन श्रीमंत होतो आणि दादरमध्ये चार फ्लॅट घेतो.

आपला,
(संतप्त) धोंडोपंत

(काही भाग वगळला : प्रशासक)