कवडसे येथे हे वाचायला मिळाले:
चांदणी चौक सोडून पिरंगुट, मुळशी मार्गे ताम्हिणी घाटाचा रस्ता पकडला आणि थोडं हायसं झालं. कारण सुट्टीला म्हणून कुठेतरी भटकायला शेवटचे कधी गेलो होतो? हा प्रश्न पडावा इतकी वर्ष उलटली होती. आता १ मे च्या सुट्टीला जोडून वीकेंड आला असल्याने कुठेतरी जाऊया असं ठरवलं होतं. पण ठरवलं तरीसुद्धा गाडी "कुठंतरी" च्या पुढेच सरकत नव्हती. कारण हे ठरत असतानाच १ तारखेला जेमतेम ५-६ दिवस उरले होते आणि त्यामुळेच आता सगळी कडेच गर्दी असेल, आपल्याला बुकींग मिळेल का वगैरे प्रश्न डोक्यात फेर धरुन नाचत होते. सरते शेवटी "दिवेआगर" ला जायचं हे फायनल झालं.