चित्रपट पाहिल्यावर, चित्रपट उगाचच काढला आहे असे वाटते. वस्तुस्थिती मध्ये मोठ्याप्रमाणावर पाणी मिसळून कथानक वाढवलेले. वरील एका प्रतिसादा प्रमाणे प्रसंग लेखकाच्या 'महारष्ट्री' (हा त्या चित्रपटातिल शब्द. महाराष्ट्रात काही वर्ष राहिल्यावर आपोआप माणुस महाराष्टी होतो.) असण्याचा काहीही संबंध नाही. कोळणीपासून पालिका कर्मचार्यापर्यंत, सिनेमा दिग्दर्शकापासून मुख्यमंत्र्यापर्यंत सर्वच महाराष्ट्री आहेत. मग हा लढा कोणासाठी? कोणाविरुद्ध? महाराष्ट्रात राहणारा तो महाराष्ट्री, या न्यायाप्रमाणे तो बिल्डरही महाराष्ट्रीच ठरतो (आणि मुंबईचा विचार करता इतर कोणत्याही अ मराठी भाषिकांपेक्षा गुर्जरबंधू अधिक महाराष्ट्री, किंवा अधिक मुंबईकर आहेत, याबाबत काही वाद नाही).

समस्येचा फार अभ्यास न करता, अपुर्या तयारीनिशी हा चित्रपट काढलेला आहे. एका शब्दात त्याचे वर्णन करायचे झाले तर : 'बटबटीत'