हे दोन्ही नेते निव्वळ बाळासाहेबांच्या घराणेशाहीमुळे पुढे आले आहेत. नाहीतर हे सामान्यांपासून काम करून वर येऊ शकले असते का ? त्यामुळे कुठला नेता चांगला ह्याचे उत्तर यापैकी कुणीच नाही असे द्यावे लागेल.

आधीपासून सत्ता हातात असेल तर झुंडशाही करून लोकप्रियता मिळवता येते. पण ती टिकत नाही. खरा नेता हा नम्र असतो, त्याच्या चेहेऱ्यावर कधी मग्रुरी दिसत नाही. त्याला लोकांची खरी कळकळ असते. तो राजकारणाकडे धंदा म्हणून बघत नाही.
आजमितीस तरी महाराष्ट्रात असा एकही नेता नाही.