१) राज हे उदध्वपेक्षा राजकारणात उजवे आहेतच, राज यांची लोकप्रियता (क्रेझ) तरुणांत जास्त आहे, मराठी अस्मितेला, मराठी माणसाच्या भूमीपुत्रनिहाय हक्काला न्याय देण्यासाठी राज ठाकरे हा एकच पर्याय आहे.
२) मनसे विधानसभेत शिवसेनेच्या सर्व जागांवर विजय मिळवेल, असे वाटत नाही. आताच झालेल्या निवडणूकीप्रमाणे मनसेने आपले अस्तित्व दाखवून दिले तरी खुप झाले.
३) महाराष्ट्राच्या भावी राजकारणात मनसे महत्वाची भुमिका बजावेल यात शंका नाही. पुढील काळात मनसेही सत्तेवर येवू शकेल. मनसेने आपली लक्ष्मण रेषा महाराष्ट्रापुरतीच आखल्याने देशाच्या राजकारणाचा (प्रत्यक्ष) सबंध येत नाही.
४) या निवडणूकीत राज व उदध्व यांनी एकमेकांवर टिका करून स्व:ताचेच नुकसान करून घेतले. शक्यतो आरोप-प्रत्यारोप टाळावेत, पण राजकारणात हे शक्य नसते. हजरजबाबीपणा हा गुण राज यांच्याकडे आहे.
५) सेनेचे माहित नाही पण मनसेचे भविष्य चांगले आहे.
शितावरून भाताची परिक्षा, या उक्तीनुसार आजुबाजुचे जे राजकीय वातावरण मला दिसले, जाणवले त्याला अनुसरून मी माझे वैयक्तिक मत मांडले आहे.