Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:
वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर टाकला की काही वर्षेतरी आम्ही आजोबांकडे जात असू. मग दोन महिने धमाल. यावेळीही जायचे ठरले होते. मी तिसरीत आणि भाऊ पहिलीत. जायचे नक्की झाले असले तरी तिकिटे आधीच बुक करावीत हा प्रकारच नव्हता. तशात सुट्या सुरू झाल्यामुळे गाड्यांना तोबा गर्दी उसळे. तरीही नेहमी सगळे जमून जाई त्यामुळेही असेल आमचे बाबा रिझर्वेशन करीत नसत. शिवाय जर काही कारणाने जाणे लांबले तर उगाच कटकट नको हेही एक कारण होतेच.