१. देशाप्रती " देवाण" जास्तीत जास्त " स्पॉट" / ' तात्कालीक करण्यासाठी.[ वायदा कर्तव्ये मोडीत काढण्यासाठी]

२. देशाने ,संविधानाने,  नेतानिवडीचा दिलेला अधिकार वाया घालून देशाच्या व स्वविकासाच्या प्रती कर्तव्यच्युती टाळण्यासाठी.

३. जाणतेअजाणतेपणे, तटस्थ राहून, अप्रत्यक्षपणे, लोकशाही असमर्थक वा विरोधींना मदत होउ नये यासाठी.

४. देशाचा नागरीक म्हणून उपभोगलेल्या हक्कांमुळे सार्वजनीक संसाधनांवर पडलेल्या  " बोजा" प्रती, कृतीशील परतफेडीसाठी.

५. लोकशाही प्रक्रियांमध्ये सामील होउन " एकसंघता" वाढीस लागण्यासाठी.

६. ज्या देशात सार्वजनीक ठिकाणी, नैसर्गीकविधी करून तिथली स्वच्छता / निर्जंतुकता अबाधीत ठेवणे, सुदृढ माणसाला सुद्धा ऐच्छिक असावे असे वाटते, अशा स्तरावरील समाजघटकांना राष्ट्रिय स्तरावरील प्रक्रियांमध्ये सहभागी करून त्याचे "शिस्तबद्ध सक्षमीकरण" करण्यासाठी. [ परस्पर / अन्योन्य समन्वयाने प्रगती--- या तत्त्वाच्या अनुसरणाने]

या व अशा इतर आवश्यक व महत्त्वपूर्ण कारणांसाठी ते अनिवार्य असावे.