Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:
लहानपणापासून अनेकवेळा आई-बाबांनी सांगितलेले, नाकासमोर चालायचे. उगाच इकडेतिकडे पाहायचे नाही. रस्त्यात कोणी भांडत असेल, मारामारी सुरू असेल तर क्षणभरही रेंगाळायचे नाही. ते म्हणतात ना चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकूनही जायचे नाही. हे मनावर ठळकपणे बिंबलेले आहे. पण कधीकधी अचानक समोर घडत असलेली घटना नजरेआड करताच येत नाही. अन नकळत हस्तक्षेप केलाच जातो.