काँग्रेस पक्षाने जाणीवपूर्वक अपसंख्यांकांना कायम झुकते माप दिले. त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.
ह्यात थोडा किंवा भरपूर निषेध करण्यासारखे काय आहे? कृपया समजावून सांगावे.

काँग्रेस्ने भरपूर भ्रष्टाचार केला, गुंड पोसले, सर्व खरे आहे. आणि म्हणूनच लोकांना चांगला पर्याय हवा होता. त्या दृष्टीने सर्व भाजपा कडे आशेने पाहत होते.
सर्व म्हणजे झाडून सगळे का?

पण भाजपाने आमची घोर निराशा केली.
भाजपाकडून आशा नव्हती त्यामुळे निराशाही नाही. तुम्ही बहुधा भाजपाच्या समर्थकांबद्दल बोलत आहात.

खरे धर्मनिरपेक्ष राज्य आणण्याऐवजी राममंदिराचा अत्यंत अव्यवहार्य मुद्दा पुढे आणला. बाबरी मशीद पाडायला प्रोत्साहन दिले आणि  अतिरेक्यांचे संकट, जे फक्त काश्मीर भागापुरते मर्यादित होते , ते सगळ्या देशावर ओढवून घेतले.
हे बरेचसे पटण्यासारखे आहे.