"मध्यरात्री, निळ्याशार पोशाखात, श्वेत अश्वावर स्वार होऊन निघालेला रुबाबदार राजकुमार"


वा वा वा काय वर्णन आहे! मस्तच. केंव्हातरी प्रत्यक्ष चित्र पहायलाही खूप आवडेल. लेख सुंदर झाला आहे.
भारतीय शास्त्रीय संगीतातल्या रागांच्या वेळांबद्दल गूढ काही नाही, उलट अनेक वर्ष कान देऊन सुरांचा परिणाम ऐकल्यावर ज्ञानी लोकांनी तयार केलेले ते संकेत आहेत. मी तर सकाळचा राग अतिशय उदास संध्याकाळी ऐकून पाहिला आहे. दिवे मालवून, डोळे मिटून अण्णांचा तोडी किंवा शिवकुमारांचा चारुकेशी ऐकल्यावर दिवसभराचा सगळा ताण निघून गेला आहे आणि एखाद्या सकाळसारखं ताजतवानं आणि उत्साहाने सळसळणारं वातावरण आजूबाजूला पसरलं आहे असंच वाटतं असा माझा अनुभव आहे. ( हे कृपा करून कुठल्याही आयटी कंपनीच्या सी ई ओ ने मनावर घेऊ नये. संध्याकाळी एक तासभर संगीत ब्रेक देऊन पुन्हा आठ तासांच्या शिफ्टवर पाठवतील. त्यांचा काय भरवसा  )
लिहीत रहा. पुलेशु.

--अदिती