@भुषणकाका, गझल आवडली.
"कसे चालले आहे?" म्हणुनी पुढे निघालो
बोलवेचना पुढचे... इतक्या दिवसानंतर छान शेर.
किती माणसे मनात होती उगीच साठुन
किती मोकळे वाटत आहे रडल्यानंतर वा वा, फारच सुंदर.
तुझ्या विचारांमधे येतसे तुझाच व्यत्यय
असेच होते जीव तुझ्यावर जडल्यानंतर * मस्तच.
प्रवास नुसता, अस्थैर्याचे गुलाम सारे
विश्व कोणते गाठावे या विश्वानंतर? वा, खरंच हा प्रश्न फारच थोड्याच माणसांना पडतो.