संजय तुम्ही मांडलेले विचार हे एका संन्यस्त माणसाला शोभतील असे आहेत, कारण हे लोक नाती, बंधने यांच्याकडे तटस्थपणे पाहू शकतो, संसारी माणसाचे तसे नसते कारण त्याचे विश्व याच गोष्टीत असते.
राजवी, एकदा का तुम्ही तुमच्या अंतरमनाचा कौल घेऊन निर्णय घेतला की तो बरोबर की चुक या भानगडीत न पडता आनंदाने अमंलात आणावा, मग त्यासाठी जी काही किंमत चुकवावी लागली तरी बेहत्तर.!
शेवटी त्यामागेही ईश्वरी प्रेरणा असते. मनाचे समाधान, एक तृप्ती अनुभवता येते, आणि हा दुर्मिळ आनंद फारच थोड्या जणास लाभतो.
आपल्याच माणसांचे शिव्या-शाप खरेच मनाला कायमचे घायाळ करुन जातात, हे जरी विसरता येत नसले तरी निदान आठवू तरी नये.
माझ्याही तुम्हांस शुभेच्छा..!!
किसी ने तो कहा है. "जो होता है, अच्छे के लिए होता है..!!"